जनता भावनिक राजकारणाला मुठमाती देणार, तानाजी सावंत यांचा ओमराजेला टोला


 परंडा |

राज्याचे आरोग्य मंत्री धारशिवचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी मुगाव इथे मतदानाचा हक्क बजवला आहे. धाराशिव जिल्ह्यात भावनिकतेला मूठ माती देत जनता विकासाचे राजकारण स्वीकारणार असल्याचा सांगत ओम राजे निंबाळकर यांना सावंत यांनी टोला लगावला आहे.

धाराशिव राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील मुगाव येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तानाजी सावंत यांनी लाईनमध्ये उभं राहत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. धाराशिव जिल्ह्यातील जनता यंदा भावनिक राजकारणाला मूठ माती देऊन विकासाचे राजकारण स्वीकारणार असल्याचं सांगितलं. त्यांनी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

अर्चना पाटील दोन लाखाच्या फरकाने विजयी होईल एवढेच नाही तर राज्यात देखील महायुती बेचाळीसच्या पुढे लोकसभेत जागा जिंकेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान उन्हाचा पारा वाढला असला तरी लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे अशी आव्हान पालकमंत्री यांनी केले आहे.

अर्चना पाटील दोन लाखाच्या फरकाने विजयी होईल एवढेच नाही तर राज्यात देखील महायुती बेचाळीसच्या पुढे लोकसभेत जागा जिंकेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान उन्हाचा पारा वाढला असला तरी लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे अशी आव्हान पालकमंत्री यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments