बार्शी! आगळगावच्या शाळेमध्ये मोठा अनर्थ टळला जेवणाच्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांचा जीव वाचला


महाराष्ट्रात सध्या पावासाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अनेक भागातील इमारती, घरांची पडझड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रिय शाळा आगळगाव प्राथमिक शाळेचेही पावसामुळे नुकसान झाले आहे. पावसामुळे शाळेच्या इमारतीला गळती लागली होती, ज्या स्लॅबमधून गळती लागली होती, त्याच स्लॅबचा काही भाग आज कोसळला. शाळेतील चौथीचे विद्यार्थी जेवणासाठी बाहेर गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

स्लॅबचा भाग कोसळला तेव्हा शाळेत जेवणासाठी सुट्टी झाली होती, त्यामुळे विद्यार्थी बाहेर गेले होते, त्यामुळे स्लॅबचा भाग कोसळला पण कोणतीही अघटीत घटना घडली नाही. आगळगाव शाळेची इमारत पूर्ण गळत असून याबाबत प्रशासनाकडे वेळीवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यामुळे आता तरी प्रशासनाने दखल घेवून भविष्यात होणारी हानी टाळावी अशी पालकांकडून मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद केंद्रिय शाळा आगळगाव ही शाळा पहिली ते
सातवीपर्यंत आहे. या शाळेची इमारत 25 ते 30 वर्षाची असून स्लॅब, कॉलम, भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments