युवकांचे प्रेरणास्थान दत्ता भाऊ भोरे....



स्वकर्तृत्वाबद्दलचा आत्मविश्वास आणि त्याला मिळालेली विद्वत्तेची जोडयांचा संगम म्हणजे युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता (भाऊ) भोरे. अभ्यासू समाजसेवक म्हणून काम करताना संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांचे वेगळेपण दिसून येते. कोणत्याही विषयाचे वस्तुनिष्ठ आकलन, मुद्देसूद मांडणी हे त्यांचे काही विशेष पैलू. असे उत्साही आणि तडफदार नेतृत्व कोणतेही जबाबदारी तितक्याच निष्ठेनेपार पाडेल असा विश्वास आहे.

राजकारणात तरुण रक्ताला वाव दिला जावा अशी चर्चा सतत सुरू असते. त्याची दखल घेत विविध राजकीय पक्ष तरुण नेत्यांची फळी उभी करताना दिसतात. अभ्यासू आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून ते साऱ्यांनाच परिचित आहेत.त्यांच्या स्वभावामुळेे तरुण वर्ग या पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल, असा विश्वास सर्वांना आहे.

स्वकर्तृत्वाबद्दलचा आत्मविश्वास आणि त्याला मि विविध विषयांचा अभ्यास करतानाच जनतेलाही विविध मुद्दे सोपे करून सांगण्यावरही त्यांचा कल असतो. . अर्थसंकल्पाबाबत सामान्यांमध्ये उत्सुकता असली तरी तो समजून घेणे साऱ्यांनाच शक्य होते असे नाही. याचे कारण त्यातील तरतुदी वा अन्य माहिती सोप्या भाषेत नसते,  त्यामध्ये ही भाऊंचा दांडगा अभ्यास आहे ,तरुणांच्या समस्या,ग्लोबल वॉर्मिंग, ऊर्जा सुरक्षा या सद्यस्थितीतील गंभीर आणि चिंताजनक समस्यांवरील दत्ता भाऊचे विचारही लक्षात घेण्यासारखे आहेत. अभ्यासू आणि विविध प्रश्नांची सखोल जाण असणारा समाजसेवक अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे पुनर्वसनाबाबतचे अनेक दावे लवकर निकाली काढणे शक्य झाले. या संदर्भात त्यांचा अभ्यास दांडगा असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. कोणतीही गोष्ट लोकांसमोर आणताना विनाकारण बोलणे त्यांना आवडत नाही. यामुळेच त्यांच्यावर संपूर्ण कारकिर्दीत "बिनबुडाचे आरोप करणारे' असा शिक्का कधी बसला नाही. 

सद्यस्थितीत युवकांनी राजकारणात करियर करावे असे त्यांना मनापासून वाटते. चांगल्या लोकांनी चांगल्या उद्देशाने राजकारणात यावे असा त्यांचा आग्रह असतो. काया, वाचा, मने, चारित्र्य सांभाळणारे नेतृत्व असा त्यांचा लौकिक आहे. आजवर कोणत्याही प्रश्नावर आक्रमक रूप धारण करताना सहज निराकरण केले.

राजकारणा व समाजकारणच्या चिखलात राहूनही दत्ता भाऊ यांचे चारित्र्य स्वच्छ-निष्कलंक राहिले आहे.  चारित्र्याचा मोठा दरारा सर्वसामान्यमध्ये असतो.   व्यक्तिगत जीवनात त्यांनी कधीही आपले राजकीय विचार येवू दिलेले नाहीत. सर्व पक्षातल्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे निकटचे, मैत्रीचे संबंध आहेत. लोकसंग्रह आणि सर्वांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची हातोटी असल्यामुळेच पक्षातल्या अंतर्गत गटाशीही ते जुळवून घेतील आणि पक्ष संघटन मजबूत करतील, असा विश्वास पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनाही वाटतो आहे. अत्यंत आक्रमकपणे पण संयमाने बोलणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. जाहीर सभांत बोलताना ते कधीही विरोधकांची व्यक्तिगत निंदा-नालस्ती करीत नाहीत. 

त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनाही त्यांचा दरारा वाटतो.अभ्यासू समाजकारणी म्हणून काम करताना संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांचे वेगळेपण दिसून येते. युवा उद्योजक दत्ता भाऊ मोरे यांना लोकवार्ता माध्यम समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments