बार्शी! फक्त आंदोलनात येणाऱ्यांचेच पैसे देऊन विमा कंपन्या आंदोलनाची हवा काढून घेताय - शंकर गायकवाड


बार्शी/प्रतिनिधी:

अनेक वर्षी आंदोलने करून राज्यातील शेतकऱ्यांच्या खातेवर नुकसान भरपाई व पिकविम्याचा परतावा देण्यास भाग पाडले परंतु मागील दोन वर्षापासून सरकार व विमा कंपन्या दरवेळी फक्त आंदोलनात येणाऱ्यांचेच तात्काळ पैसे देऊन आंदोलनाची हवा काढून घेत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये केला.

सरकार व विमा कंपन्या राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खातेवर नुकसान भरपाई जमा न करून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करून कोरोणा विषाणूच्या खाईत लोटत असल्याचा आरोप करत जर लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खातेवर अतिवृष्टीची व विमाभरपाई जमा न झाल्यास नाविलाजाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असाही इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला,त्यावेळी बार्शी तालुका वकिल आघाडीचे प्रमुख ॲड. इकबाल पठाण, सौरभ यादव, नाना तिकटे, प्रविण घेमाड, विठ्ठल तिकटे, सुरज वांगदरे, रणजीत माने, सुरज चौधरी, अमोल जगताप, धनाजी बरडे, अर्जुन तिकटे, संतोष गोरे, मारुती टोणगे, बालाजी घेमाड, सुरज शिंदे, सागर जगताप, बालाजी तिकटे, शंकर पाटील, रामानंद मुटकुळे, पांडुरंग वांगदरे, नागनाथ टोणगे, एकनाथ राऊत आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक घोडके यांनी केले तर आभार रणजित बरडे यांनी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments