महाराष्ट्रात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय


कोरोना परत एकदा मोठ्या प्रमाणात येऊ पाहत आहे त्यातच रुग्णांची संख्या हि वाढतच चालली आहे. त्यामुळे शासनाला नियम निर्बंध हे कडक करावे लागत आहेत. संपूर्ण राज्यात येत्या रविवार पासून रात्रीची जमाबंदी असा आदेश जारी करण्यात आला.त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत.

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे , वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी ( दिनांक २८ मार्च २०२१ ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसर्व विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त , पोलीस अधीक्षक , जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन , जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य , वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती , करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या त्यावेळी ते बोलत होते .

Post a Comment

0 Comments