"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांना पुरेशी मदत नाही" - भाजपा


बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॅाग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमच मुळात नकली असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
(Advertise)

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप पुरेशी मदत दिली नसल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

(Advertise)

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात खाजगीकरण सुरू झालं. शरद पवारांचं कृषिमंत्री असताना पाठवलेलं पत्र आज समोर आहे. ज्यात शेतकऱ्यांचा हितासाठी खाजगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीलं आहे, असंही उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला राज्यातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा दिला आहे. 

Post a Comment

0 Comments