स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना संधीची कमाल मर्यादा निश्चित!


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षांबाबत एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांस संधीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार खुला (अराखीव) उमेदवारांस कमाल सहा संधी उपलब्ध राहणार आहेत. अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.  उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील. 

यासह उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील

 उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी दिली माहिती

 परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन २०२१ मध्ये प्रसिध्द होणा-या जाहिरातीस अनुसरुन आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल. 

Post a Comment

0 Comments