शाळा सुरू करण्याचा निर्णय आता जिल्हा प्रशासनाकडे


 कोरोना आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन राज्य सरकारनं शाळा बंद ठेवत ऑनलाईन शैक्षणिक सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 
(Advertise)

 चार ते पाच महिने लोटल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागानं २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी इयत्तेचे शाळेत वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र, राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याची नोंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी शाळा उघडण्याचा निर्णय लांबण्याची शक्यता आहे. 
(Advertise)

शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा असल्याचं सांगत शिक्षणमंत्र्यांनी तसे संकेतही दिले आहेत.राज्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वीच मुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 
(Advertise)

 महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या आदेशानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबद्दल ट्विट करून अधिक माहिती दिली आहे.यात जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतरच शाळा सुरू करण्यात येतील, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Post a Comment

0 Comments