राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही - मुख्यमंत्री ठाकरे


विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती.
(Advertise)

 राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.आज ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारा नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
(Advertise)

 आपण अद्याप शाळा सुरु करू शकलेलो नाही. निर्णय तर आपण घेतला आहे. परंतु अद्यापही आपण शाळा सुरु करू शकू का हे प्रश्नांकित आहे असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. 
(Advertise)

कारण समजा शालेय शिक्षक आजारी पडले, विद्यार्थी आजारी पडले तर काय करायचे? या सर्व गोष्टींची काळजी घेत आपल्याला हळू हळू सर्व गोष्टी उघडायच्या आहेत असं ठाकरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments