कार्तिकी वारीत पालखी व दिंड्यांना पंढरपुरात येण्यास बंदी


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपुरात 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी वारी होणार आहे. कार्तिकी साठी येणाऱ्या पालखी व दिंड्यांना पंढरपूर मध्ये येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. कार्तिकी वारीच्या सर्व सोहळ्यावर राज्य सरकारकडून बंदीचे आदेश विधी व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सुपा साळुंखे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
(Advertise)

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी बंदी

कोरोना महामारी चा प्रादुर्भाव असल्यामुळे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून कार्तिकी वारी साठी वारकरी व भक्त पंढरपुरात दाखल होत असतात, कार्तिकी यात्रा कालावधीत एकादशी सोहळ्या दिवशी 7 ते 8 लाख भाविकांची गर्दी होते. त्यामुळे ही गर्दी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर येथे केंद्रीत झाल्यास कोरोनाचा मोठा धोका होऊ शकेल. यामुळे कार्तिकीला कोणत्याही दिंड्यांना अथवा वारकर्‍यांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे आहे
(Advertise)

कार्तिकी यात्रा रद्द करावी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

कार्तिकी वारी एकादशी दिवशी पंढरपुरात संचार बंदी करावी व होणारी गर्दी टाळण्यासाठी यात्रा रद्द करावं, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविला होता. 
(Advertise)

महाराज मंडळी विधानसभा पती नाना पटोले यांचेशी चर्चा

वारकरी सांप्रदायाच्या महाराज मंडळींनी 18 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानसभा सभापती नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. यामध्ये मर्यादित स्वरुपाच्या यात्रेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे वारकरी सांप्रदायाच्यावतीने सांगण्यात आले.

यात्रा निर्बंधाऐवजी निर्विघ्नपणे पार पाडा

आगामी काळात येणार्‍या कार्तिकी यात्रेस शासनाचे सर्व नियम पाळत परवानगी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांसह आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यात्रेला यंदा परवानगी मिळावी, या मागणीसाठी यात्रा समन्वय समितीचे सुधाकर महाराज इंगळे, राणा वासकर महाराज, रामकृष्ण वीर महाराज, निवृत्ती रामदास महाराज यांनी पदाधिकार्‍यांसमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले.

Post a Comment

0 Comments