पंढरपुर
कार्तिकी यात्रा मोजक्याच दिवसांवर आली असून पाडवा मुहूर्तावर श्री विठ्ठल मंदिर खुले करण्यात आले आहे. पांडूरंगाची कार्तिकी वारी 26 नोव्हेंबरला होणार असून त्यावेळी पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन होणार नाही. वारकऱ्यांच्या संख्येत आरोग्य यंत्रणा अपुरी पडेल. त्यामुळे यंदाची कार्तिकी यात्राही आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.
कार्तिकी वारी या कारणांमुळे वारी रद्द करण्याची मागणी
विठ्ठल मंदिरे सुरु झाल्यानंतर पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने आता दररोज दोन हजार भाविकांना मुखदर्शनासाठी सोडले जात आहे. मात्र, आठ महिन्यांपासून श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर बंद असल्याने यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल. दर्शन रांगेत तथा वाळवंटात, मठात वारकऱ्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकणार नाही. त्या गर्दीत वयस्क भाविकांना श्वास घेण्यास अडचणी येतील, दर्शन रांगेत तथा वाळवंटात, मठात वारकऱ्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकणार नाही. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवल्यास सध्याची पाच किलोमीटरची रांग 25 किलोमीटरपर्यंत जाईल. गर्दीमुळे आरोग्य यंत्रणाही अपुरी पडेल. त्यामुळे वाळवंट परिसरात, 65 एकर परिसरात वारकऱ्यांना राहता येणार नाही.
मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठविला प्रस्ताव
कार्तिक वारीनिमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून भाविकांना यंदाची वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून सरकार दरबारी पाठविला आहे. विठ्ठल मंदिर समितीच्या ठरावावर प्रातांधिकाऱ्यांनी अभिप्राय देत, तो प्रस्ताव जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात आला. त्यानुसार तो प्रस्ताव आता विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेला आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर आचारसंहितेचे सावट व मराठा समन्वय समितीकडून विरोध
कार्तिक यात्रेच्या शासकीय महपूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या आगमनाच्या दृष्टीने प्रशासन व मंदिर समितीतर्फे सर्व उपाययोजना केल्या आहेत. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरु आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यासाठी मान्यता घ्यावी, असाही प्रस्ताव विधी व न्याय विभागाला जिल्हा प्रशासनाकडू विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या पूजेस उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देण्यात येऊन न देण्याचा इशारा देण्यात आला आहे न पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतरच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. तर मराठा समाज आरक्षणाबाबत पंढरपुरात आक्रमक होताना दिसत आहे, कार्तिकी वारी येण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशा मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालय देण्यात आले आहे. तसे न केल्यास कार्तिकी वारी पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांना येऊ न देण्याचा इशारा मराठा संघटनेचे समन्वयक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
1 Comments
कार्तीकी वारी रद्द करु नये
ReplyDelete