चंद्रकांत पाटलांमूळेच पदविधरांच्या नोकऱ्या गेल्या : जलसंपदा मंत्री जयंत पाटील


कोल्हापूर/प्रतिनिधी: 

चंद्रकांत पाटील पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करत असल्यापासूनच पदवीधारांच्या नोकऱ्या गेल्या असून यासोबतच पदवीधरांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याऐवजी त्यामध्ये अधिकच वाढ होत गेली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.

(Advertise)

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज शनिवारी कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये महाविकास आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
(Advertise)

पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि प्रा.जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
(Advertise)

पुढे बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले,चंद्रकांत पाटील आता पुण्याला गेले आहेत. पुण्यातील त्यांच्याच लोकांचे आता मला फोन येत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी विरोधी पक्षालाच फायदा होतो.भाजपच्या धोरणामुळे देशावर आणि राज्यावर ही वेळ आली आहे. त्यामुळे राज्याप्रमानेच या मतदारसंघातही महाविकास आघाडी सरकारच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
(Advertise)

यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार पी एन पाटील, आमदार प्रकाश आबिटकर,आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, निलोफर आजरेकर , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील,अरुण दुधवडकर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments