कोरोनाची भरती-ओहोटी

         

✒️प्रा.प्रशांत वीर-पाटील
                                                                                निसर्गाचा समतोल बिघडला की त्याचा विसर्ग होतो यामध्ये तिळमात्र शंका नसावी याचा प्रत्यय कोरोना या महाभयंकर रोगाच्या कालखंडात जाणवला. भरती-ओहोटी हा नैसर्गिक कालचक्राचा भाग असला तरी कालनिश्चित आहे. कोरोना वायरसच्या बाबतीत अनिश्चितता संपूर्ण जगात चिंतेच आणि भितीच वातावरण निर्माण केल आहे. कोरोना वायरसवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न जगभर होतो आहे काही काळानंतर लस तयार देखील होइल. परंतु या संकटाच्या कालखंडामधे कोरोनामुळे मानवी जीवनाच्या विविध पैलूवरती केलेला मारा हा अगदी असह्य आहे. शारीरिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक,मानसिक अशा विभिन्न अंगाने केलेला मारा हा शतकोत्तर असावा,कारण मानवाने वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रात केलेली प्रगती पाहता निसर्गाने मानवाला त्याची जागा दाखवुन दिली आहे. 

कोरोना वायरसच्या पुढे प्रगत - अप्रगत राष्ट्र असा भेदभावविरहीत झालेले मोजमाप आपणाला या महामारी संकटाची तीव्रता जाणवून देते. निसर्ग मानवी प्रगतीच्या आड येत नसला तरी अवास्तवी आणि हव्याशी प्रगतीच्या आड येण्यात तो जराही कचरत नसावा. प्रत्येक राष्ट्र आपापल्या परीने या जागतीक संकटाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. "ना लस, ना उपाय, सुरक्षा हाच तरणोपाय" म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने आपली आणी आपल्या कुटुंबाची निर्देशित सुचना आणी उपायांचे पालन करून समोर जाण हाच यावर उपाय आहे.        
                                                               सामाजिक सुरक्षिततेचा भाग म्हणून सामाजिक अंतर बाळगणे हे सर्वाच्याच हिताचे आहे. समाजशास्त्रीय अंगाचा विचार करता सामाजिक अंगाने झालेले बदल लोकांच्या सहजपचणी पडलेले दिसुन आले. सामुहिक आणि वैयक्तिक आरोग्य, स्वच्छता असो की खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावुन लग्न, समारंभ, सण, उत्सवावरती होत असलेला अवाजवी खर्च यावर लोकांच्या नाइलाजास्तव का होइना ताळेबंदी लागलेली दिसते,ही  ताळेबंदी जेवढी व्यक्तीगत तेवढीच राष्ट्र आणी पर्यावरण हितासाठी ठरली, कारण या वर्षी अगदी वेळेवर पेरण्या, लागण, उगवत झालेली दिसते यातच शेतकरी आनंदी आहे. 

कदाचित लॉकडाऊन मध्ये पर्यावरण समतोल सुधारण्याचा थोड्या प्रमाणात का होईना मदत झाली. उद्योग, सेवा, कारखाने संकटात आले असता शेतकरी मात्र खंबीरपणे उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे ही जमेची बाजू आहे. लॉकडाऊन मधे अनेकांचे रोजगार गेल्याने एक प्रकारे नैराश्य, भिती आणि अनिश्चिततेच वातावरण निर्माण झाले असले तरी हे ठराविक कालखंडासाठी गृहीत धरून पुढे चालावे लागेल. आर्थिक वैफल्याच्या काळामध्ये लोकांनी आपापले छंद, आवडी-निवडी जोपासण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. बागकाम, वाचन, गायन, पाककृती, लेखन, नृत्य हे अंगी बाळगणे फायदेशीर ठरेल. कारण अनेक दिवसांपासूनची घर बंदीस्ती लोकांमध्ये नैराश्य, चिडचिड, रसहीनता तसेच संतापाला आमंञण देऊ शकते. त्यामुळे आपले छंद, आवडी याला नक्कीच बगल देवु शकतील. सामाजिक अंतर, मास्क, ग्लोज, सॅनिटायझर सोबत मानसिक आरोग्याची काळजी घेण देखील तेवढच महत्वाच आहे. आपल्या सर्वावर घरचा विठोबा होण्याची वेळ आली असली तरी हा विठोबा आपल्याच हितासाठी आहे याच भान सतत ठेवण अत्यावश्यक आहे. शासकीय पातळीवर या संकटातून  बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी व्यक्तीगत आणि सामुहिक पातळीवर आपण सर्वांनी संयम आणि नियम पाळणे गरजेचे आहे. तरच आणि तरच कोरोना पासुन आपला बचाव आहे. शहराकडुन ग्रामीण भागाकडे संक्रमित होणारा कोरोना आपण सामुहिक प्रयत्नाने रोखु शकतो एवढे मात्र नक्की.                                                                                                                 चला तर सामुहिकरित्या कोरोना शी लढा देवु.                                                   

Post a Comment

0 Comments