नळदुर्ग किल्ल्यावर सेल्फीच्या नादात नवविवाहितेने गमावला जीव


धाराशिव |

 मोबाईल हा मनुष्याचा जीव की प्राण आहे. सेल्फी घेताना नवविवाहित तरूणी किल्ल्यावरून पडली असल्याची माहिती समोर आली. धाराशिव  येथील भुईकोट किल्ल्यात अशीच एक दुर्घटना घडली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरूणीचा मृत्यु झाला आहे. निलोफर अमीर शेख असे त्या तरुणीचे नाव आहे.

धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग भुईकोट किल्ला हा सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदी जवळजवळ 3 किमी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत 114 बुरूज आहेत. यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात.

किल्ल्याच्या बुरूजावरून तरूणीचा सेल्फी घेताना मृत्यु
निलोफर अमीर शेख या तरूणीचे अवघ्या दहा दिवसांआधी विवाह झाला होता. त्यानंतर ती पतीसोबत फिरण्यासाठी आली. नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात उपळाई बुरूजवरून सेल्फी घेताना मोह आवरला नाही. तिचा तोल सुटला आणि तरूणी पडली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

नवीन संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या 22 वर्षीय निलोफर अमीर शेख हिचे दहा दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. ती तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावात राहत होती. ती किल्ल्यावरून पडल्याची घटना घडली आहे. तिला नळदुर्ग येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली.

किल्ल्यावर अनेक पर्यटक येत असतात. अशा ठिकाणी डोंगर दर्या, नदी नाले तसेच धबधबे देखील असतात. त्यावेळी सेल्फी काढण्यासाठी अनेक लोकं त्या ठिकाणी जमलेली दिसत असतात. यावेळी सेल्फी घेत असताना अनेकांना आपला तोल सावरता येत नाही आणि असे अपघात होण्याची शक्यता असते.

Post a Comment

0 Comments