शंभर कोटी वसूली प्रकरणी सीबीआयकडून पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप व ईडीच्या कारवाईवर टीका केली. “पाच वेळा एकाच घरात चौकशी कशी काय केली जाऊ शकते. वास्तविक, पाहता सर्व तपास यंत्रणांचा वापर राजकीय दृषीनं केला जात असल्याचे पाहायला मिळत असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.
शरद पवार यावेळी ते म्हणाले, अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे काम सुरु आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकला. पाच वेळा एकाच घरात चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनंच करायला हवा.
0 Comments