राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार, राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याचा दावा


मुंबई |

महाराष्ट्र राज्यातील पाचही टप्प्यातील मतदान पार पडले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्याआधीच राज्यातील राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची २७ मे रोजी मुंबईत महत्वाची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात लवकरच मोठं इनकमिंग होणार असून राज्यातील काही नेते आपल्या आणि अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केले आहे.

आमची आढावा बैठक जरी असली, तरी आम्ही स्पष्टपणे धोरण ठरवलेले आहे. आता एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र, हे सूत्र आम्ही राबवणार आहोत. या माध्यमातून पुन्हा एकदा संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील. १० तारखेला वर्धापन दिन असून मुंबई आणि दिल्लीत साजरा करण्याचे नियोजन आहे. त्या बैठकीला सर्व नेते उपस्थित राहतील.

तसेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या अनेक सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश राज्याच्या, देशाच्या आणि पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल, अशी माहिती सुनील तटकरे यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments