खडसे म्हणजे विझलेला दिवा, गिरीश महाजनांचा हल्लाबोल



मुंबई |

गावातली सात लोकांची ग्रामपंचायत सुद्धा  त्यांच्याकडे नाहीये.  त्यांच्या पत्नी सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये पडल्या. आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची मुलगी पडली. बँक होती ती सुद्धा गेली त्यांच्याकडे काय राहिले आहे?  जो दिवा भिजलेला आहे त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का ?" असा सवाल करत भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला.

भाजपच्या वरिष्ठ पातळीवर नेत्याशी भेटीगाठी नंतर खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार असे जाहीर केले आहे, त्या पार्श्वभूमीवर पारंपारिक प्रतिस्पर्धी मंत्री गिरीश महाजन यांनी जोरात टीका केली आहे.

Post a Comment

0 Comments