कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना आता सरकार देणार अर्धा पगार...


 सध्याच्या कोरोना संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने अधिसूचित केले आहे. हे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये रजिस्टर्ड असलेल्या कामगारांना ५०% अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देतील. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे ४० लाखाहून अधिक कामगारांना फायदा होणार आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी च्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूमुळे देशातील सुमारे १२ कोटी लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बेरोजगार झाले आहेत. यात कारखान्यांमध्ये काम करणार्‍यांची संख्या सुमारे  १.९ कोटी आहे. एकट्या जुलै महिन्यातच ५० लाख लोक बेरोजगार झाले आहेत. या प्रकरणात, कारखान्यांमध्ये काम करणार्‍या आणि कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे.

कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना आता तीन महिन्यांसाठी अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट म्हणून पगाराच्या ५० टक्के रक्कम देण्यात येईल, असा निर्णय सरकारने नियमांना लवचिक बनवून घेतला आहे. यावर्षी २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत नोकरी गमावलेल्या कामगारांना हा लाभ देण्यात येईल. सरकारच्या या निर्णयामुळे साथीच्या काळात रोजगार गमावलेल्यांना आता बेरोजगारी भत्ता मिळणार आहे.

ESIC कामगारांना ही सुविधा दिली जाईल. ते तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ५० टक्के रकमेचा दावा करू शकतील. पूर्वी ही मर्यादा २५% होती. अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना ही ESIC द्वारा संचालित योजना आहे.

कोरोना संकटात बेरोजगार कामगारांना ESIC शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. अर्जाच्या पडताळणीनंतर ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. यासाठी कारखान्यात काम करणाऱ्या बेरोजगारांचा आधार क्रमांक घेतला जाईल आणि त्यांचा हा दावा खरा ठरला तरच त्यांना 50 टक्के पगार दिला जाईल.

Post a Comment

0 Comments