महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ३० लाखाचा अपहार ; तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल


तुळजापूर |

महाराष्ट्र ग्रामीण बॅकेच्या एका कर्मचाऱ्याने ३० लाखाचा अपहार केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन राजाराम इरीचे ( रा. टाकळी राशीन, जि. सोलापूर ) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सचिन राजाराम इरीचे यांनी दि.08.09.2022 रोजी 10.30 ते दि.29.12.2022 रोजी 17.30 या कालावधीत विविध कर्ज खात्यातवर रक्कमेची बेकायदेशीरपणे आपल्या पदाचा गैरवापर करुन रकमेचा अफरातफर करुन बॅकेची एकुण 29,51,276 ₹ची फसवणुक केली. अशा मजकुराच्या महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा तुळजापूरचे व्यवस्थापक- वैभव सदाशिव देशमुख यांनी दि. 27.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 409, 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments