त्या मयत महालेच्या नातेवाईकास 4 लाखाची तातडीची मदत



बार्शी -  ३० जुलै रोजी नारीवाडी व कारी परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तेथील भागातील ओढ्यांना पाणी येऊन पूर आला होता. ओढ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन महिला भगिनी प्रवाहात वाहत गेल्या होत्या. त्यातील एका महिलेला पोहता येत असल्याने त्या लगेच किनाऱ्याला लागल्या. परंतु मयत रुक्मिणीताई हरिदास बदे वाहून गेल्या व दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेने बदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

या घटनेनंतर बदे कुटुंबियास योग्य ती शासकीय मदत देण्याची आमदार राजेंद्र राऊत यांनी सूचना दिल्या.  प्रशासकीय पातळीवर अधिका-यांनी  योग्य ते नियोजन करीत, तातडीने महाराष्ट्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातून तातडीची ४ लाख रुपयांची मदत केली.

आज  तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या हस्ते नायब तहसीलदार संजीवन मुंढे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या उपस्थितीत बदे कुटुंबियास ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

Post a Comment

0 Comments