मोहोळ/प्रतिनिधी;
आंघोळीसाठी ठेवलेल्या गरम पाण्याच्या बादलीत पडून भाजल्याने तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला.अजिंक्य भीमराव थोरबोले (वय ३, रा. शिंगोले, ता. मोहोळ) असे मयत बालकाचे नाव आहे. २५ जुलै रोजीच त्याचा तिसरा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनी साजरा केला होता. पण वाढदिवसाच्या चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू झाल्याने थोरबोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
घरात भावासोबत खेळत असताना अजिंक्य हा तोल जाऊन आंघोळीसाठी ठेवलेल्या गरम पाण्याच्या बादलीमध्ये पडला. यात त्याचा पाठीपासून ते मांडीपर्यंतचा, पोटाचा व अवघड जागेचा भाग मोठ्या प्रमाणात भाजला. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला लगेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला काहीच दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
0 Comments