क्रांती रेडेकर म्हणते आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर


NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मला योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी तिने या पत्रात केली आहे. माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी सुरु आहे, असे तिने पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, क्रांती रेडकर हिने शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. पण अद्याप त्यांना भेटीची वेळ मिळालेली नाही. क्रांती रेडकर हिने तिचे म्हणणं मुख्यमंत्र्यांना भेटून सांगायचे आहे. त्यासाठी तिने मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे.

Post a Comment

0 Comments