ज्या वारकऱ्यांचे कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण, त्यांनाच पंढरपुरात प्रवेश घ्यावा - नगराध्यक्षा साधना भोसले


पंढरपूर/प्रतिनिधी:

राज्य सरकारकडून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी दहा मानाच्या पालकांना एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला प्रस्थान करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  मात्र या मानाच्या पालख्यांचे सहभागी महाराज मंडळी व वारकरी मंडळींनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन डोस घेतले असेल तरच पंढरपूर शहरात प्रवेश घ्यावा अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष साधना भोसले यांनी दिली आहे याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. 

सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून कोरोना च्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. मात्र ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती भयावह झाली होती. त्यात पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठी होती. पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर आहे. याच ठिकाणी पंढरपूर शहरातील नागरिकांची घनता जास्त प्रमाणात आहे. त्यातील प्रामुख्याने प्रदक्षिणा रोडवर राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याच ठिकाणी वारी मध्ये वारकऱ्यांची संख्या जास्त असते. आषाढी वारी नंतर कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नगराध्यक्षांनी ही मागणी केली आहे.

तालुका प्रशासन व पंढरपूर नगर परिषदेच्या आटोकाट प्रयत्न नंतर शहरातील व तालुक्यातील कोरोना बाधित यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे होणारे आषाढी एकादशी होण्यासाठी राज्य सरकारने मानाच्या पालख्याना परवानगी दिली आहे. त्या पालखीसोबत येणाऱ्या वारकरी व महाराज मंडळींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणचे दोन डोस पूर्ण झालेले असावेत, अशांनाच पंढरपूर शहरामध्ये प्रवेश घ्यावा अशी मागणी नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments