राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या.अन्यथा तीव्र आंदोलन - शंकर गायकवाड ; शेतकरी संघटनेने दिले निवेदन


बार्शी/प्रतिनिधी:

राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी राज्याचे कृषी आयुक्त व पिकविम्याचे राज्य प्रमुख यांना पुणे येथील कार्यालयात निवेदननाद्वारे दिला.त्यावेळी अमोल चौधरी, संदीप चौधरी, मनोज गवळी, गणेश चौधरी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
(Advertise)

राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कबुल करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली मग विमा कंपन्या त्या पंचनाम्याचे आधारे भरपाई का देत नाहीत?असा सवाल करून,लवकरच शेतकऱ्यांच्या खातेवर विमा कंपन्यांनी परतावा जमा केला नाही तर विमा कंपनीचे मालकांच्या घरावर व संबंधित सर्व कार्यालयावर तीव्र स्वरूपाची आंदोलने केली जातील असेही शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले.

 

Post a Comment

0 Comments