.....म्हणून शरद पवार म्हणाले! "ठाकरेंना मुख्यमंत्री करून मोठी चूक केली ?"


उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून सर्वात मोठी चूक केल्याची भावना शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे बोलताना व्यक्त केली आहे. ते महाविकास आघाडी चे शिल्पकार शरद पवार यांचा फोन हि घेत नाहीत, या सगळ्याला उद्धव ठाकरेंचा स्वभाव कारणीभूत असल्याचा चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहेत.

एकनाथ शिंदे किंवा संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर परवडलं असतं, असे हतबलतेने पवार राऊतांपुढे व्यक्त झाल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालादरम्यान दै.'मुंबई तरुण भारत व सा.विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पश्चिम बंगाल ते पंढरपूर' या चर्चासत्रात ते बोलत होते.

थत्ते म्हणाले की, "बाळासाहेबांनी स्वबळावर सत्ता आणली नाही, शरद पवार हे कधी महाराष्ट्राचे ममता बॅनर्जी होऊ शकले नाहीत. उद्धव ठाकरेंना ते शक्यच नाही. शरद पवारांनी आयुष्यभरात कधी ५२-५५ आमदारांच्या पुढे सत्ता आणली नाही. शिवसेनेला ते शक्य नाही आणि ममता बॅनर्जीं महाराष्ट्रात येऊन त्यांच्या तारणहार बनतील, अशी अपेक्षाही नाही."

" त्यामुळे महाविकास आघाडीकडे फडणवीसांच्या विरोधात उभा करण्यासाठी एकही सक्षम नेतृत्व नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये फाटाफूट अटळ आहे ती लवकरच होईल, शिवसेनेतच अनेक जण नाराज आहेत. सेना आतून पोखरली गेली आहे. पक्षांतर्गत खदखद आहे.", असा दावाही थत्तेंनी केला आहे.

Post a Comment

0 Comments