कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा कमी होत आहे, हे आनंददायी चित्र असले तरी मृत्यूदर काही ठिकाणी वाढलेला बघायला मिळत आहे, वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन मुळे थोड्या प्रमाणात फरक पडला असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे आता लॉकडाउन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वाना पडला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात करोनाचा कहर उच्चांक गाठत असल्यानं देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी राज्याच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजुन यश मिळालेलं नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केलं आहे.
0 Comments