".....१५ मेनंतर लॉकडाऊन वाढणार का संपणार?" राजेश टोपे म्हणतात....


राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना रूग्णांची  वाढती संख्या पाहाता ४ एप्रिलपासून सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध १ मे रोजी सकाळी ७ वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे लॉकडाऊन असेल की नाही अशी चर्चा सुरू झाली होती. पण आता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू करण्यात आल्यानंतर आता १५ मेनंतर लॉकडाऊन वाढणार का संपणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, 'आम्ही लक्ष ठेवून आहोत. आता देखील रोज ५५ हजार ते ६० हजार नव्या रूग्णांची  (patients) नोंद होत आहे. राज्यातील पॉझिव्हीटी रेट हवा तेवढा कमी होताना दिसत नाही. ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. पण अद्यापही काही जिल्ह्यामध्ये संख्या कमी आहे, तर काही ठिकणी स्थिर असून काही जिल्ह्यात वाढत आहे.'

टोपे पुढे म्हणाले, 'जिल्ह्यांमधील रूग्णांची संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. येत्या १५ तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे १५ तारखेच्या दरम्यान लॉकडाऊन वाढवायचा की संपवायचा निर्णय घेण्यात येईल.' असं देखील राजेश टोपे म्हणाले. 



Post a Comment

0 Comments