"रात्री अंगाला हळद लागली ; पहाटे प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या"



जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मालखेडा मध्ये अत्यंत खळबळजनक प्रकार उघकिस आला आहे. हळदीच्या अंगाने घरातून पळून नवरीने मामाच्या मुलांसोबत गळफास घेऊन जीवन संपवल्याची समोर आली आहे. स्नेहा राजू आव्हाड आणि नवनाथ सुरेश गायकवाड अशी मृतांची नावे आहेत.

स्नेहा राजू आव्हाड (रा मुबंई) या मुलीचे भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे सोबत विवाह रविवारी १६ मे रोजी दुपारी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह आयोजित करण्यात आला होता. या विवाहसाठी मुलींकडील नातेवाईक कोळेगाव येथे आले होते. शनिवारी १५ मे रोजी रात्री मोठ्या उत्साहात हळदीचा कार्यक्रम झाला.

नवरीला व नवरदेवाला हळद लावण्यात आली व रात्री उशिरा सर्व जण झोपी गेले. मात्र, पहाटे ४ वाजेच्या दरम्यान स्नेहा आव्हाड ही तिच्या मामाचा मुलगा नवनाथ सुरेश गायकवाड ( २१ रा मालखेडा हा कोळेगाव ) सोबत मालखेडा येथे आली. येथे सुरेश गायकवाड यांच्या घरात दोघांनी आपण एकत्र जगण्यामरणाची शपथ घेतली आहे असे म्हणत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलशिग बहुरे, पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजाराम तडवी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments