उजनीचा पाणीप्रश्न पेटला : 'पवार साहेबांनी उजनीचे धरण बारामतीसाठी घेऊन जावे' : शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील


सांगोला/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. या प्रश्नावरून जिल्ह्यातील शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक झाले आहे. त्यातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भाजपाच्या जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी तीव्र आंदोलन केले होते. त्यातच आता शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.. 'पवार साहेबांची सत्ता आल्यानंतर उजनीचे पाणी बारामतीला जाते, त्यापेक्षा पवारांनी धरणाच बारामतीला न्यावे' अशी घणाघाती टीका आमदार पाटील यांनी केली.

उजनी पाणी बचाव समिती आक्रमक

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पाच टीएमसी पाणी उजनी धरणातून द्यावी अशी मागणी केली होती त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी देत उजनीतील पाच टीएमसी पाणी देण्याची मान्य केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी संघटना व भारतीय जनता पार्टी आक्रमक होत तीव्र आंदोलने केली आहेत. यातूनच पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यासह राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून जोरदार हल्ला चढवला जात आहे. उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून माऊली फळांवर व दीपक भोसले यांनी जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरासमोर  जागर आंदोलन करत आहे. त्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या घरासमोर समितीच्यावतीने हलगी नात आंदोलन केले..

शरद पवार यांनी फक्त बारामतीचा विकास पाहिला

सांगोला तालुक्यातील महूद येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या घरासमोर उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे नेत्यांनी हलगी नाद आंदोलन केले. त्यावेळेस आमदार पाटील यांनी राज्य सरकारने घेतलेल्या उजनीतील पाच टीएमसी पाण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ज्या ज्या वेळेस राज्यात सत्ता आली आहे. त्यावेळेस फक्त बारामती तालुक्याचा विकास झाल्याचे दिसून येत आहे. ज्यावेळेस पण पवार यांची राज्यात सत्ता येते त्यावेळेस उजनीचे पाणी बारामतीला दिले जाते. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते वसंतराव नाईक यांच्यापर्यंत सर्वांनी राज्याचा विकास पाहिला. मात्र शरद पवार यांनी फक्त बारामतीचा विकास पाहिल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला..

तर धरणात बारामती ला घेऊन जावे..

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे पाणी हे हक्काचे पाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील विविध एमआयडीसी व बारामती शहराच्या पाणीप्रश्‍नासाठी उजनी तले पाणी नेले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी या ना त्या कारणासाठी उजनीचे पाणी वापरत असतात. त्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण हे बारामतीला जावे असे घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. उजनी धरणाच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण तापले आहे. यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेच्या आमदारांनी विकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे येत्या काळात उजनी धरणावर महाविकास आघाडी मध्ये खूप पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments