ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवारांकडे - महादेव जानकर


पंढरपूर/प्रतिनिधी:

रासपचे नेते महादेव जानकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल आता मातोश्रीवर नसून तो सिल्वर ओककडे गेला आहे आणि हे सरकार शरद पवार चालवत आहेत असा घणाघात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. मंगळवारी पंढरपूरमध्ये पक्षाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

(Advertise)

जानकर म्हणाले, सध्या ओबीसींच्या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असून मराठा आणि ओबीसी तरुणांनी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी तोपर्यंत डोकी थंड ठेवा असं आवाहनही जानकरांनी केलं. 

तसेच, फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिलेले एक हजार कोटींची निधी ठाकरे सरकारने द्यावेत, मराठा आणि धनगर आरक्षणांच्या प्रश्नावर कोर्टाचा खर्च ठाकरे सरकारने उचलावा अशी मागणी त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments