काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन यांवरुन केंद्र सरकारला घेरले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत ज्या पद्धतीने वर्तन करत आहे, त्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधी म्हणाले, सरकारला शेतकऱ्यांना घाबरवायचे धमकावायचे आहे. पण, सरकारचे हे काम नव्हे. सरकारचे काम शेतकऱ्यांची संवाद करुन तोडगा काढण्याचे आहे. सरकारने ते करायला हवे. मी शेतकऱ्यांना चांगले ओळखतो. शेतकरी मागे हटणार नाहीत. केंद्र सरकारलाच मागे हटावे लागेल. फायदा यातच आहे की, सरकारने लवकर एक पाऊल मागे येत मागे हटावे. यातच भले आहे.
1 Comments
जरा रिंगणात या आता तरी सरकार मजबूत नाही तुम्ही कमजोर आहात म्हणून हे सगळं चालुय
ReplyDelete