“कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही” -प्रकाश आंबेडकर



 केंद्र सरकार सरकरी कंपन्यांचं खासगीकरण करणार असल्याचं कंपन्यांना वाटत असल्यामुळं शेअर मार्केट वर गेेले आहे.  मात्र, केंद्राने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

कोरोना काळात शेअर मार्केट खेळण्यासारखं झालं होतं. मात्र आता ते सावरलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारने कोरोनानंतर आपलं पहिलं बजेट सादर केलं आहे. 

(Advertise)

दरम्यान, कोरोना काळात आयटी सेक्टरमधील कामगार हे व्हर्च्युअली काम करत होते. तसंच लॉकडाऊनमुळे ज्यांचं पुनर्वसन झालं त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना नातेवाईकांच्या रेशनकार्डवर धान्य घ्यावं लागत आहे. त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही, अशी टीकाही आंबेडकरांनी केंद्र सराकारवर केली आहे.

Post a Comment

0 Comments