बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान शनिवार पार पडलं. त्यानंतर आता १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर होत आहेत. या एक्झिट पोलनुसार बिहारच्या जनतेने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. यामध्ये राजद हा सर्वात मोठा पक्ष तर भाजपा दुसरा सर्वाधिक मतं मिळवणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्ही अॅक्सिस पोलच्या सर्वेनुसार, राजदचे सर्वात प्राध्यान्यक्रम असलेले उमेदवार आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र ३१ वर्षीय तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी सर्वाधिक जनता उत्सुक आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव (राजद) – ४४ टक्के, नितीश कुमार (जदयू) – ३५ टक्के तर चिराग पासवान (लोजपा) – ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
0 Comments