मराठा क्रांती मोर्चा पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा शनिवारी निघणार


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर येथील नामदेव पायरी जवळ विठ्ठलाच्या चरणी नसमस्तक होऊन मराठा आक्रोश मोर्चाच सुरुवात होणार आहे.  पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने मराठा समाजाने एखादा हाक दिली. सरकारने किती दबाव टाकला तरीही माघार घेणार नसल्याचे सखल मराठा समाज समन्वयक धनंजय साखळकर यांनी सांगितले. ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
   
यावेळी महेश डोंगरे, दीपक वादडेकर, किरण घाडगे, संदीप मांडवे, स्वागत कदम, सतीश शिंदे, अर्जुन चव्हाण, संदीप मुटकुळे उपस्थित होते.

सखल मराठा समाज समन्वयक महेश डोंगरे म्हणले, आरक्षण मिळवण्यासाठी शहीद झालेल्या बांधवांना १० लाख रुपये मिळाले नाही ते देण्यात यावे. महाराष्ट्र राज्य महामंडळात नोकरी देखील देण्याचे आश्वासन पूर्ण करावे. राज्य सरकार गांभर्याने घ्यावा. केंद्र व राज्य सरकारने समन्वयाने प्रश्न सोडवावा असे आवाहन करत या मोर्चामध्ये राज्याच्या विविध भागातून मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, राज्यभरातील मराठा समन्वयक आणि मराठा संघटना प्रमुख, मराठा सेवक सहभागी होणार आहेत.  राज्यातून जास्तीत जास्त समाज बांधवांनी शनिवारी पाच वाजेपर्यंत मुंबईच्या आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. 

साखळकर म्हणाले, कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले यावे असे धनंजय साखळकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments