करमाळा /प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथील शेतकरी बाबुराव दगडु कोडलिंगे यांच्या पोंधवडी उमरड शिवेवर उमरड हद्दीत असलेल्या गट नंबर ३१४/६ या क्षेत्रातील अकरा महिने संभाळलेला दोन एकर उस महावितरणच्या डिपी वर झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे जळुन खाक झाला आहे.
सदरची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली आहे .महावितरण ने पंचनाम्याचे सोपास्कार पार पाडले असले तरी तलाठी या ठिकाणी फिरकले नाहीत.
या परिसरात एच ओ डी एस मधुन जवळपास पंधरा डिपींची कामे झाली आहेत मात्र पंधरा व सोळा एच पी च्या डिपीवर तिन एच पी च्या सुद्दा मोटारी चालत नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात याच योजनेतून १६ एच पी डिपी झालेला आहे .या डिपी वर वारंवार शॉर्ट सर्किट होत होते .संबंधित विभागाच्या आधिकार्यांना वारवंवार तोंडी सांगुन सुद्धा दुरुस्ती केली नाही. अखेर मंगळवारी दुपारी तिन वाजता मोठा बार होवुन स्पार्कींग झाले व दोन एकर उस व २८० फुट पाईपलाईन, शेतातील ठिबक जळुन सुमारे तिन लाखाचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी बाबुराव कोडलींगे यांनी सांगीतले.
उसा बरोबरच दोनशे ऐंशी फुटाची पाईपलाईन व ठिबक जळुन सुमारे तिन लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी बाबुराव कोडलींगे यांनी दिली.
शेतातील जळालेला उस लवकर कारखान्यात गाळपासाठी गेला तर किमान तिस टक्के तरी वजन येवु शकते परंतु चिखलात गेलेला रस्ता लगेच दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्याला तिस हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे.
ऊसाची लागवड,खते,खुरनपी,बांधणी,व आत्ता उस जळाल्याने होणारा घाटा ,उस बाहेर काढण्यासाठी करावा लागलेला तिस हजाराचा खर्च याचा विचार करता शेतकऱ्याच्या हातात झालेला खर्च सुद्धा पडणार की नाही हा सवाल उपस्थित होत आहे.
महावितरण च्या गलथान कारभाराचा फटका बसलेल्या कुटुंबाने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महावितरणच्या कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. स्थळ पाहणी करुन पंचनामा केला आहे.श्री जाधव अभियंता करमाळा महावितरण बाबुराव कोडलिंगे यांच्या जळित उसाचा पंचनामा केला असुन सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन वरिष्ठ विभागाकडे आवहाल सादर करणार आहोत.
0 Comments