बार्शी: परतीच्या मान्सूनचा धुमाकूळ; शेती कामांना ब्रेक....विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा अन पाऊस



बार्शी/प्रतिनिधी:

विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा, टपोरे थेंब असे अक्राळ- विक्राळ रूप धारण करीत रविवारी मध्ये रात्री परतीच्या पावसाने निरोप घेत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात पावसाने आकांड- तांडव केले.

राज्यात काही दिवस पावसाचा खंड पडला होता. मात्र, बंगालचा उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ असलेले चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी वातावरण बनत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस राहणार आहे.

शनिवारी सायंकाळपासून तालुक्यात पावसाने सुरुवात केली होती. सुरुवातीला हलका वाटणाऱ्या पावसाने काही मिनिटात उग्र रूप धारण केले. विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा आणि टपोरे थेंब घेत रात्रभर धुमाकूळ घातला. तडाख्यात डाळिंब, लिंबू, सीताफळसह फळबागा तर खरिपातील तूर, कपाशी, मका आणि ऊस पिके भुईसपाट झाले.

यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास निसर्गाच्या प्रकोपात हिरावून नेला. रब्बीची नुकतीच पेरण्यात आलेली ज्वारीच्या पिकाला बाधा पोहोचली आहे. दिवसभर उभे असलेले पीक सकाळी सपाट झालेलं होत हे दृश्य डोळ्यात पाणी आणीत शेतकरी पाहत होते.

Post a Comment

0 Comments