Share Market: आधी त्सुनामी... मग रिकव्हरी!



निवडणूक निकालाच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली, मात्र केंद्रात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या कमबॅकवर शिक्कामोर्तब झाल्यास मागील तीन दिवसांत मार्केटने जोरदार रिकव्हरी केली. निकालाच्या दिवशी झालेली प्रचंड पडझड मार्केटने तीन दिवसांत भरून काढली असून शेअर बाजारातील रिकव्हरीनंतर आता गुंतवणूकदारांमध्ये मतभिन्नता दिसत आहे की भविष्यात बाजाराची वाटचाल कशी असेल?


निवडणुकीनंतर बाजाराची कामगिरी

मागील चार सार्वत्रिक निवडणुकांच्या आकडेवारीनुसार सेन्सेक्स आणि इतर निर्देशांक बऱ्यापैकी स्थिर दिसत असूननिकालाच्या दिवशी कामगिरीची पर्वा न करता निकालानंतर पाच दिवस आणि एक महिन्यानंतर वधारले. २००४ मध्ये निवडणूक निकालानंतर सेन्सेक्स पाच दिवसात १६% वधारला, तर बेंचमार्कने एका महिन्यात सुमारे ७% परतावा दिला.

२००९ मध्ये नकारात्मक परतावा दिला

२०१४ आणि २०१९ मध्ये सेन्सेक्सने निवडणूक निकालानंतर पाच दिवसांनी २.२% आणि २.५ टक्क्यांची उडी घेतली. तर २००९ मध्ये फक्त एकदाच सेन्सेक्सने निकालानंतर पाच दिवसांत १.९८% नकारात्मक परतावा दिला आणि निकालाच्या एका महिन्यात सुमारे ०.१३ टक्के घट नोंदवली.

शेअर बाजारात स्थिरता कधी येणार?

मागील पाच सार्वत्रिक निवडणुकांबाबत JM फायनान्शिअलच्या मूल्यांकनाबाबत निकालानंतर तीन महिन्यांनी बाजाराने सकारात्मक परतवा दिला परंतु, प्रादेशिक आधारावर निकालाच्या सहा महिन्यांनंतर बहुतेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परतावा दिसला. डेटा दर्शविते की निकालानंतर स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅपमध्ये उत्कृष्ट वाढ झाली असून आठवडाभरानंतर बाजारात स्थिरता येईल, असा विश्वास ब्रोकरेजना आहे.

बाजाराचा मूड कसा असेल?

निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाची स्थापना, पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा आणि प्रमुख धोरणात्मक घोषणा व जुलैमध्ये आर्थिक वर्ष २०२५ साठी अर्थसंकल्पाचा बाजारावर परिणाम होताना दिसून येईल. JM फायनान्शिअलने सांगितले की कोणत्याही घसरणीत खरेदी व्हावी असा आमचा विश्वास असून बाजारात सुधारणा अपेक्षित असल्याचे ब्रोकरेजचे मत आहे.

Post a Comment

0 Comments