तर शेतकरी लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही सरकारची दानादाण उडवतील!... शंकर गायकवाड


बार्शी |

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व तालुकाध्यक्ष शरद भालेकर यांचे नेतृत्वाखाली बार्शी-धाराशिव रस्त्यावर, बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी दिगंबर रणखांब, दत्तात्रय पाचकवडे, संतोष दळवी, प्रदीप कोंढारे, जीवन गावडे, रघुनाथ कोंढारे, अमर पाटील, दीपक कोंढारे, अशोक पाटील, तुळशीदास चव्हाण, पोपट कोंढारे, दत्तात्रय जगताप, सौदागर जाधव, दत्तात्रय जाधव, बिभीषण शिंदे, मोहन कोंढारे, ज्ञानेश्वर कोंढारे, स्वप्निल कोंढारे, रामहरी पेजगुडे, काकासाहेब बळी, तुषार सवणे, सुमंत तुपेरे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
  
 शंकर गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले की, प्रत्येक जण उठसूट आमचे सरकार हिंदूंचे असल्याचे सांगत असतात मग आजपर्यंत साडेचार लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या ते हिंदू नव्हते का? असा सवाल उपस्थित करत, जर शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शेतकरी सरकारची दानादान उडवतील! असा खणखणीत इशाराही यावेळी शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.
   
 सन 2023 मधील खरीप व रब्बीचा उर्वरित पिकविमा, दुष्काळ व येलो मोझॅकची भरपाई, व उर्वरित शेतकऱ्यांचे कांदा अनुदान द्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शरद भालेकर यांनी सांगितले. मागण्यांचे निवेदन बार्शीच्या अप्पर तहसीलदार वृषाली केसकर व नारीच्या मंडळाधिकारी
मेघना राजपूत यांनी स्वीकारले तर या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार काशीद व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता.


Post a Comment

0 Comments