कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार; भाजपने गेम केल्याचे चर्चा?


मुंबई |

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांवर निवडणुका घोषित केल्या होत्या. आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात शिक्षक, पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र आता मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेतली आहे. अभिजीत पानसे हे आपला अर्ज मागे घेतला आहे. 

मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना वैयक्तिक विनंती केली की, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाकडून निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत, मनसेकडून अभिजीत पानसे हे उमेदवार होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन असा निर्णय घेतला की, अभिजीत पानसे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार नाही. निरंजन डावखरे हेच कोकण पदवीधर निवडणुकीत उमेदवार असतील. एक-दोन वेळा चर्चा झाल्यानंतर निरंजन डावखरे आज राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते. त्यांनी राज ठाकरे यांचा आशीर्वाद घेतला असून आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली.

फडणवीसांच्या विनंतीमुळे मनसेची माघार भाजपा बिनशर्त पाठिंबा देणार का? या प्रश्नावर बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले की, याबद्दल राज ठाकरे स्वत: बोलतील, पण त्यांनी फडणवीसांना सांगितलं आहे की, हे वारंवार होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केल्यानंतर आमचा निर्णय बदलला असला तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे. विविध निवडणुका येत असतात त्यामुळे यावेळी आम्ही उमेदवारी न लढवण्याचा निर्णय घेतला हे जरी खरं असलं तरी ही गोष्ट वारंवार होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. कारण आमची निवडणुकीसाठी तयारी आधीपासून झाली होती. परंतु फडणवीसांच्या विनंतीमुळे आम्ही माघार घेतली आहे, असेही नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केली आहे.

Post a Comment

0 Comments