12 वी नंतर उघडतात अनेक सरकारी नोकऱ्यांचे दरवाजे; या क्षेत्रांमध्ये आहे नोकरीची संधी


आपल्याला माहित आहे का की आपल्या देशात 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर रेल्वे, राज्य पोलीस, भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना, रेल्वे, टपाल विभाग आणि इतर क्षेत्रात सरकारी नोकरी मिळू शकते. या तुम्ही वर्षी बारावी उत्तीर्ण होणार असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरतीसाठी तयारी सुरू करु शकता.

इंडियन रेल्वेत आहे बारावी पास उमेदवारांसाठी मागणी

रेल्वेमध्ये एएलपी, असिस्टंट लोको पायलट, आरआरबी एनटीपीसीसह इतर भरती उपलब्ध आहेत; ज्यामध्ये तुम्ही 12वी उत्तीर्ण झाल्यानंतरच भाग घेऊ शकता. रेल्वेत सरकारी नोकरी मिळण्यासोबतच तुम्हाला रेल्वेकडून मिळणाऱ्या इतर सुविधाही दिल्या जातात._

स्टाफ सिलेक्शन कमिशन
दरवर्षी, स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे अशा अनेक नोकऱ्या जाहीर केल्या जातात ज्यामध्ये 12वी उत्तीर्ण झाल्यानंतरच सहभागी होता येईल. यामध्ये लष्करापासून स्टेनोग्राफरपर्यंतच्या पदांवर नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठी बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे बारावीनंतर या क्षेत्रात यायचे असेल तर आतापासूनच एसएससीच्या परीक्षेची तयारी सुरू करा.

पोलीस विभाग भरती
अनेक राज्यांमध्ये, पोलीस  विभागाने कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी इंटरमिजिएट उत्तीर्ण पात्रता निश्चित केली आहे. अशा परिस्थितीत बारावी उत्तीर्ण होताच पोलीस खात्यातील नोकरीची तयारी करून तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता.

भारतीय टपाल विभाग
या सगळ्याशिवाय भारतीय टपाल विभागात 12 वी उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. यामध्ये तुम्हाला जीडीएस, असिस्टंट, पोस्टमनसह इतर विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळू शकते.

Post a Comment

0 Comments