पंढरपुरात आजपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री



पंढरपूर |


विठ्ठल नगरी पंढरपुरात आजपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच प्रवेश दिला जाणार आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच सर्व आमदार खासदार विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळेल.विविध पक्षांच्या मराठा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदार राज्यात संवेदनशील होऊन गेला आहे. राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढत चालला आहे. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून अनेक जिल्ह्यात सर्वपक्षीय नो एन्ट्री सुरु झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या  आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments