वैराग/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील जामगाव(पा) येथे अवैध दारूविक्री सर्रास होत असल्याने सरपंच ग्रामसेवक/ ग्रामस्थ /ग्रामपंचायत जामगाव (पा) आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावातील दारू बंद करायची असा ठरावच त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर सरपंच /उपसरपंच/ग्रामसेवक /ग्रामस्थ ग्रामपंचायत जामगाव (पा) वैराग पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन दिले.गावात दारूविक्री सर्रास केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनीही केला.
दारुमुळे मौजे जामगाव (पा )येथील नजीकच्या काळात एकूण दहा ते पंधरा व्यक्ती मरण पावले व यामुळे यांचे संसार उघड्यावर आले आहेत या उपर गावातील आणखीन वीस ते पंचवीस तरूण दारूच्या व्यसनात आहारी गेले आहेत .जर गावातील दारूबंदी झाली नाही तर यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होईल .म्हणून गावातील सर्व अवैध्य दारू विक्री बंद झाली पाहिजे.
यामुळे गावातील वातावरण पूर्णपणे दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनीही केला आहे.दारूबंदीसाठी पोलिसांनी गाव परिसरात गस्त वाढवावी व त्यांच्यावर वचक ठेवावा, यासाठी गावातील सरपंच/ उपसरपंच /ग्रामसेवक /ग्रामस्थांन ग्रामपंचायत जामगाव (पा) ग्रामसभेत हा विषय मंजूर करून घेतला. बेकायदेशीर दारूविक्री बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, दारूबंदी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
सदर पोलिसांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की बेकायदेशीर अवैद्य धंदे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
हे ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वैराग, उत्पादन शुल्क अधिकारी यांना दिल्या आहेत.
0 Comments