"ना मर्दांच्या वार केले तर शिवसेना घाबरणार नाही"



 महाराष्ट्र  आणि मराठी माणसाविरोधात जे आक्रमण सुरू आहे. त्याविरोधात कोणी तरी रणशिंग फुंकायला हवं होतं. ते शिवसेना भवनातून  आम्ही फुंकत आहोत. तू काही पाप केलं नसेल, काही गुन्हा केला नसेतल तर कुणाच्या बापाला घाबरू नको, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सागंत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही  त्याच पद्धतीने शिवसेना पुढे नेत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र हा गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, हा संदेश देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल, अडसूळ असतील, वायकर असतील, परब आणि भावना गवळी यांच्यासह पवार कुटुंबीयांवर तपास यंत्रणांनी हल्ले केले आहेत, असं राऊत म्हणाले.

राष्ट्रपती राजवट लावून सरकार पाडण्याचा डाव
शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात आज पत्रकार परिषद घेऊन हा धमाका केला. राऊत यांनी कालच शिवसेनेची पत्रकार परिषद होणार असून त्यात भाजपच्या साडेतीन लोकांची पोलखोल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राऊत काय पोलखोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

यावेळी खासदार विनायक राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आदेश बांदेकर, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, विनोद घोसाळकर, आनंदराव अडसूळ, मंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, मिलिंद नार्वेकर, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सुनील राऊत, नगरसेविका राजूल पटेल आदी शिवसेना नेते उपस्थित होते.

संजय राऊत दुपारी दैनिक ‘सामाना’च्या कार्यालयातून निघाले. त्यानंतर ते 3.35 वाजता शिवसेना भवनात दाखल झाले. राऊत गळ्यात भगवा शेला घालून आले होते. राऊत यांची गाडी येताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली. ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘मुंबई आमच्या बापाची, नाही कुणाच्या हक्काची’ आदी घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. भाजप चिरीमिरी आहे. कुठे फाडून फेकू कळणार नाही, अशा घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या.

त्यानंतर राऊत यांनी गाडीतून उतरून हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन करताच एकच जल्लोष झाला. यावेळी शिवसेना भवनाबाहेर हजारो शिवसैनिक जमले होते. तसेच या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. भाजप वैयक्तिक राजकारण करत आहे. त्यांना सडेतोड उत्तर दिलच पाहिजे. महापालिकेच्या निवडणुकीत काय होईल हे कळेलच, असा इशारा शिवसेनेच्या रणगाणिंनी दिला.

Post a Comment

0 Comments