पंढरपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्राची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
पंढरपूरच्या विठुरायाच्या माघी एकादशी उत्सवासाठी
सिंधुदुर्गातून एसटीच्या १२५ गाड्या वारकऱ्यांसाठी सोडल्या जात होत्या. यातून एसटीला तब्बल ४८ लाखाचे उत्पन्न मिळत होते. यंदा मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे; मात्र वारकऱ्यांनी पायीवारीबरोबरच खासगी बस गाड्यांचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे जिल्हातील वारकऱ्यांचा पंढरपूरचा प्रवास यंदा महागला आहे.
राज्यातील एसटी महामंडळाच्या संपाला नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. तब्बल ९० दिवसापेक्षा अधिक या संपाचा कालावधी लोटला आहे. राज्यातील काही आगारांमध्ये थोड्याफार एसटी बस सेवा सुरू झाली. जिल्ह्यातही काही प्रमुख मार्गावर एसटी बस गाड्या धावत आहे; मात्र एसटीचे जवळपास १४०० पेक्षा अधिक कर्मचारी अजूनही संपावर आहे. विशेष म्हणजे एसटीचे चालक आणि वाहकांनी संपात शंभर टक्के सहभाग नोंदवला आहे. सिंधुदुर्ग विभागातून एसटीच्या नियमित २१०० फेऱ्या होत्या. सध्या दहा ते बारा फेऱ्या सुरू आहेत; मात्र खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील जत्रा, उत्सवातून एसटीला उत्पन्न मिळत असे.
याचबरोबर पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची माघी एकादशीला मोठी रांग लागत असे. जिल्ह्याच्या विविध गावात एसटीच्या विशेष गाड्या सोडल्या जात असत माघी एकादशी उत्सवाला कोकणातून जाणारे पांडुरंगाचे भक्त मोठ्या प्रमाणात आहे. याचे कारण कार्तिकी एकादशीला कोकणात भातपीक घेतले जाते. त्यामुळे वारकरी फारशे कार्तिकी एकादशीला न जाता माघी एकादशीला मोठ्या संख्येने कोकणातील वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात.
0 Comments