बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील सौदरें गावाच्या सरपंच चैताली गोटे यांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याची व शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार चंद्रकांत दिगंबर कानगुडे यांनी केला आहे.
घरकुल अनुदान बरोबरच शौचालय अनुदान बेकायदेशीरपणे घेतले असल्याचा आरोप कानगुडे यांनी तक्रार अर्जात केला आहे. यामुळे सरपंच चैताली गाटे यांच्यासह इतर दोषींवर कारवाई करण्याची कारवाई गटविकास अधिकारी शेखर सावंत असे संबधित विभागाला पत्र देऊन केली आहे. माझ्या पत्राची दखल न घेतल्यास २६ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले जाईल.
0 Comments