गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर नुकतीच दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर पावसाळी अधिवेशना दरम्यान गोव्याच्या विधानसभेतही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर विरोधकांना उत्तर देतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
बलात्काराच्या घटनांवर बोलताना ‘तरुण मुलांच्या आई-वडिलांनी आपली मुलं रात्री कुठे जात आहेत याकडे लक्ष द्यायला हवं’, असं वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संबंधित घटनेबद्दल विधानसभेत माहिती दिली. या घटनेत १० तरुण समुद्रकिनारी पार्टीसाठी गेले होते.
यातील सहा जण घरी परतले मात्र चौघे जण तिथंच थांबले होते. यात दोन मुले आणि दोन मुली होत्या. अल्पवयीन मुलांचं अशा पद्धतीनं रात्रभर घराबाहेर राहणं योग्य नाही, असंही प्रमोद सावंत यांनी म्हटलं.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील ४ दिवस महत्त्वाचे
एक १४ वर्षांची मुलगी संपूर्ण रात्रभर समुद्रकिनारी भटकत असेल तर आई-वडिलांना आत्मनिरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. केवळ मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण केवळ सरकार आणि पोलिसांवर ही जबाबदारी टाकू शकत नाहीत, असं वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भर विधानसभेत केलं.
0 Comments