कोर्लई येथील जमीन खरेदी प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केली. या तक्रारीची पुढील ७ दिवसात दखल घेऊन गुन्हा दाखल झाला नाही, तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार करू, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आलेली आहे. वन कायद्याचा भंग, वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी तक्रारीत केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. अलिबागच्या डीवायएसपी सोनाली कदम यांची भेट घेऊन तक्रारींचा ४०२ पानी दस्तऐवज सोमय्यांनी सादर केला. यात फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पुरावे दिल्याचे सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
0 Comments