राज्यपालांना आधीच कळवले होते, की परवानगी नाही म्हणून ; सीएमओकडून स्पष्टीकरण



राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे सरकारवर भाजपा नेत्यांकडून टीका होत आहे. माञ, ठाकरे सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत झालेल्या प्रकारावर खुलासा केला आहे.  बुधवार दिनांक १० फेब्रुवारीला मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत मान्यता दिलेली नाही, असा निरोप राजभवन सचिवालयाला देण्यात आला होता, असे स्पष्टीकरण सीएमओकडून देण्यात आले आहे. 

राज्य शासनाने म्हटले आहे की, राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे, किंवा नाही याची खातरजमा करायला हवी होती. ती खाञी न केल्याने राज्यपालांसारख्या महान व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.  

तसेच राज्य शासनाने म्हटले आहे की, राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते. विमानाला परवानगी  मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते, असा नियम आहे. या नियमानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक १० फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. माञ, राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खाञी करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्यपालांच्या प्रवासाची संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी : राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत झालेल्या प्रकारावर मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे म्हणाले की,  वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते. ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली आहे. राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी सुचना मुख्यमंञी ठाकरे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments